Thursday, 2 November 2017

शिवचरित्र



म्यान तलवारी उसळल्या, गरजले राजे शिवाजी
चैतन्ये स्फुरण पावले रायरेश्वरी येसाजी बाजी

मुलुख टीचभर होता, केली अयोध्या पुण्याची 
शककर्ता जन्माला जयावर, धन्य शिवनेरीची माती 

उतरला तो चांदतारा, चढल्या भगव्या ध्वजाही
प्रत्येक भगवा रचित होता, फत्तरे स्वराज्याची 

खजिन्यास येथे ददात नव्हती, भक्तीची शौर्याची
माणिक मोती स्वराज्यातील, मदारी अन वीर तानाजी   

किल्ले सिंहगड, रायगड, प्रतापगडाची थोर महती
यमसदनी धाडिले येथे उदेभान, मोरे, अफजल आदी 

धाक तो शाह्यांस बसवला, आदिल अन कुतुबशाहासी   
डच, वलंदाज, इंग्रज मावळयास बिचकून असती 

घेरा पन्हाळ्यास पडता, निघाला शिव विशाल्यासी 
काशीद देई आत्महुती, घोडखिंड पावन करे बाजी  

बोटे छाटली गेली जेंव्हा, शास्तास शास्त झाली 
ससैन्य पोचले कोंढगडी,  रिपूस दिसती जळत्या मशाली

सुरत बदसुरत बनली, दिल्लीपती औरंगशहाची 
आग्र्यातुन सुटले शिवाजी अन वाट धरली दक्षिणेची 

स्वयम येती गागाभट्ट, करण्या राज्याभिषेक शिवासी 
बसे पायरीस युवराज शंभू, ज्यास रुद्रावतार म्हणती   

प्रतिपदेचा चंद्र वाढता, गरजे जय श्री शिवछत्रपती 
छत्र चामरे घेउनी उभे, अष्टप्रधान सभास्थानी 

कौतुके पाहे मा जिजाऊ , आरूढ पुत्र सिंहासनासी 
झाली असे प्रतीज्ञापुर्ती, स्थापना झाली स्वराज्याची 


©भार्गव हिरवे 

No comments:

Post a Comment

Popular Posts